चित्त स्थिर, सर्व सुंदर Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 26, 2026 ‘तू थांब जरा, सर्वकाही ठीकठाक आणि स्थिरस्थावर झालं की माझं चित्त थार्यावर येईल.’ .. तर नाही, असं नसतं. चित्त थार्यावर आलं की, सर्वकाही सुस्थितीत येत असतं. असा विचार करणे, हा आपला निव्वळ एक भ्रम असतो. वास्तव तर याच्या पूर्णपणे उलट आहे – जेव्हा आधी आपलं चित्त (मन) थार्यावर येतं, तेव्हाच आयुष्यातील इतर सर्व गोष्टी सुस्थितीत येऊ लागतात. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःचे मन स्थिर करणे, हाच कोणत्याही समस्येवरचा खरा उपाय आहे.या मागची कारणे काय आहेत :✨ शांत मन, घेते अचूक निर्णय: मन स्थिर असेल तर अत्यंत गोंधळाच्या आणि कठीण परिस्थितीतही योग्य आणि स्पष्ट निर्णय घेता येतात.✨ आपल्या दृष्टिकोनात बदल: अशांत मन साध्यासुध्या समस्येलाही खूप मोठे ‘संकट’ समजतं, तर शांत चित्त मोठ्या आव्हानांमध्येही सहज ‘मार्ग’ शोधून काढतं.✨ आतून बाहेरील बदल: जीवनातील सुख आणि समाधान बाहेरून आत येत नाही, तर ते आपल्या मनाच्या अंतर्गत शांततेतून बाहेरच्या जगात पसरते.Dr. Sunetra Javkar 9820373281 ©Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Related Daily Digest CultureDaily digestmarathimindmotivational